Header Ads

ad

महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत टिपु सुलतान भवन आणि वाचनालयाचा निर्माण करण्यात यावा

जालना,22 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
शहीद टीपु सुलतान यांच्या जयंती निमित्ताने शहीद टिपु सुलतान चौक, रेल्वे स्टेशन जालना येथे जाहीर सभा चा आयोजन करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून शहीद टिपु सुलतान यांचे चौथे मुलाचे सातवे वंशज शहजादे मंसुर अली टिपु राष्ट्राध्यक्ष तहरीके खुदा दाद हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मुस्लीम ओ. बी.सी. ऑर्गनायजेशचे संस्थापक अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष तहरिके खुदा दादचे शेख शफी, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सय्यद साबेर, अल्पसंख्याक काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष बदर चाऊस, अमजद खान, मुक्तार लिडर, फेमस बॅटरीवाले वसीम भाई, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर, गुलाब पटेल, इरफान कॅप्टन, सरफराज बाबा, अ.रऊफभाई, नाना उगले पाटील, शेख अब्दुल खुद्द्ुस, शेख अमिन सर, अजहर कॅप्टन व इतर उपस्थित होते.
यावेळी शहीद स्वातंर्त्य सैनिक टिपु सुलतान यांचे वंशज शहजादे मंसुर अली टिपु यांनी भाषण करतांना सांगितले की, शहीद टिपु सुलतान यांचा देशासाठी योगदान अविस्मरणीय आहे आणि शहीद टिपु सुलतान यांनी देशासाठी आपले प्राण पण त्याग केले. शहीद टिपु सुलतान यासारख्या हुतात्म्यांना महाराष्ट्र राज्याचे सर्व जिल्ह्यात टिपु सुलतान भवनच्या निर्माण करुन शहिद टिपु सुलतान यांना राज्य सरकार ने खरी श्रध्दाजंली देण्यात यावी. आमच्या देशाला पहले मिसाईल शहीद टिपु सुलतान यांनी दिले. त्यसाठी राज्याच्या सर्व जिल्हयात शहीद टिपु सुलतान यांच्या  नावाने वाचणालय उघडण्यात यावा आणि या टिपु सुलतान भवन आणि वाचणाल्यासाठी आम्ही आमच्या नेत्यांना पाठपुरावा करावा आणि आमच्या नेत्यांना वादे देण्याठी नव्हे तर समाजाठी काही तरे करावे असे दिलखुलासपणे सांगीतले, राज्य सरकारने शासकीय प्रणाली प्रमाणे, टिपु सुलतान शहीद यांची जयंती साजरा करण्यात यावी अशी मागणी ही यावेळी शहीद टिपु सुलतान शहीद यांचे वंशज यांनी केली आणि म्हणाले की निजाम सरकारच्या वंशाजांना सरकारी तर्फे वजीफा देण्यात येत आहे पण शहीद टिपु सुलतानच्या वंशजनां ही वजीफा पण देण्यात यावा अशी ही मागणी शेवटी करण्यात आली. हा कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी  मिर्झा अन्वर बेग, जहीर बिल्डर, सोहेल बिल्डर, मुश्ताक भाई, अब्दुल खुद्दुस भाई, मजहर सौदागर, शेख मुसा, मोईज अन्सारी, अजहर डी.सी.एल., अफसर चौधरी, नासेर नाना, अजहर पठाण आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एजाज सर, डॉ.मुक्तदीर सर यांनी केले. तर शेवटी आभार प्रदर्शन मिर्झा अन्वर बेग यांनी केले.

No comments

Thank you for your feedback.