ट्रकने चिरडल्याने तरुण ठार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
वाशिम,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
नागपूर-मुंबई महामार्गावर शेलुबाजार येथे ट्रकने 15 वर्षीय तरुण आणि शेळीला चिरडल्याची घटना आज (रविवार) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सचिन टोंचर या तरुणाचा आणि शेळीचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रक अडवून पेटवून दिला. यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. रस्त्यावर मधोमच ट्रकला आग लावल्यामुळे बराच वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेलुबाजार येथे सतत अपघात होत असल्याने याठिकाणी बायपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागपूर-मुंबई महामार्गावर शेलुबाजार येथे ट्रकने 15 वर्षीय तरुण आणि शेळीला चिरडल्याची घटना आज (रविवार) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. यात सचिन टोंचर या तरुणाचा आणि शेळीचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्रक अडवून पेटवून दिला. यात ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला. रस्त्यावर मधोमच ट्रकला आग लावल्यामुळे बराच वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेलुबाजार येथे सतत अपघात होत असल्याने याठिकाणी बायपास करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Post a Comment