अयोध्या दौर्यानंतर उद्धव ठाकरेंमध्ये बदल होईल - रावसाहेब दानवे
उस्मानाबाद,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
अयोद्धेतून श्रीरामाचे दर्शन घेऊन आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्यात बदल होईल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवे हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बुथप्रमुखांच्या निवडीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यानिमित्त त्यांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपने निवडणुकांची पुर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार दानवे यांनी राज्यातील मतदारसंघातील माहिती दिली. त्यानुसार त्यांनी राज्यातील 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघात विस्तारक नेमले आहेत. एका बूथवर 25 कार्यकर्ते काम पाहतील. राज्यातील 92 हजार बुथपैकी 80 हजार बुथ गठित केले आहेत, त्याचबरोबर या नेमलेल्या बूथ प्रमुखांसोबत 25 कार्यकर्ते असतील, याप्रमाणे आमची निवडणूकीची तयारी सुरू आहे. तसेच सेना व आम्ही एकत्र लढलो, तर हे कार्यकर्ते मित्र पक्षालादेखील मदत करतील. काही मतदार संघात सेनेचा उमेदवार असेल, तरी आम्ही पक्ष वाढवण्यासाठी हे कार्यकर्ते नेमले आहेत, अशी माहिती दानवे यांनी दिली.
अयोद्धेतून श्रीरामाचे दर्शन घेऊन आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्यात बदल होईल, असे भाकीत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दानवे हे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बुथप्रमुखांच्या निवडीसाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. त्यानिमित्त त्यांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला.
भाजपने निवडणुकांची पुर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार दानवे यांनी राज्यातील मतदारसंघातील माहिती दिली. त्यानुसार त्यांनी राज्यातील 48 लोकसभा व 288 विधानसभा मतदारसंघात विस्तारक नेमले आहेत. एका बूथवर 25 कार्यकर्ते काम पाहतील. राज्यातील 92 हजार बुथपैकी 80 हजार बुथ गठित केले आहेत, त्याचबरोबर या नेमलेल्या बूथ प्रमुखांसोबत 25 कार्यकर्ते असतील, याप्रमाणे आमची निवडणूकीची तयारी सुरू आहे. तसेच सेना व आम्ही एकत्र लढलो, तर हे कार्यकर्ते मित्र पक्षालादेखील मदत करतील. काही मतदार संघात सेनेचा उमेदवार असेल, तरी आम्ही पक्ष वाढवण्यासाठी हे कार्यकर्ते नेमले आहेत, अशी माहिती दानवे यांनी दिली.
Post a Comment