राम मंदिर प्रकरणी भाजप-सेना एकत्र बसून मार्ग काढतील - गिरीश बापट
पुणे,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच पालकमंत्री गिरीश बापट यांनी सावध भुमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. राममंदिर हा जुना विषय असून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याप्रकरणी भाजप-सेना एकत्र बसून याविषयावर मार्ग काढतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बापट म्हणाले, की राम मंदिर हा मुद्दा सध्या न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे सरकारसह सर्वांना एकत्र येत यावर तोडगा काढावा लागेल. उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याबाबत बोलताना ते म्हणाले, की कोणीही रामभक्त अयोध्येत जाऊ शकतो. सर्वांना भावना आणि स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर हा विषय राष्ट्रीय पातळीवर आणि धोरणात्मक असल्याने पक्ष नेतृत्व विचार करुन मार्ग काढेल.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्यावर विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच पालकमंत्री गिरीश बापट यांनी सावध भुमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे नेते आहेत. राममंदिर हा जुना विषय असून न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे याप्रकरणी भाजप-सेना एकत्र बसून याविषयावर मार्ग काढतील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बापट म्हणाले, की राम मंदिर हा मुद्दा सध्या न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे सरकारसह सर्वांना एकत्र येत यावर तोडगा काढावा लागेल. उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्याबाबत बोलताना ते म्हणाले, की कोणीही रामभक्त अयोध्येत जाऊ शकतो. सर्वांना भावना आणि स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर हा विषय राष्ट्रीय पातळीवर आणि धोरणात्मक असल्याने पक्ष नेतृत्व विचार करुन मार्ग काढेल.
Post a Comment