Header Ads

ad

बेकायदेशीररित्या मंदिर उभारण्याचा कोणीही प्रयत्न करू नये - रामदास आठवले

पुणे,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
राम मंदिराला आमचा विरोध नाही, पण बेकायदेशीररित्या मंदिर उभारण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जानेवारीमध्ये येणार आहे, त्यामुळे राम मंदिर बांधू इच्छिणार्‍यांनी काही काळ शांत रहावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
न्यायालयाचा निकाल दोन्ही धार्मिक गटांना न्याय देणारा असणार असल्याचेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंचा राष्ट्रभक्त मुस्लिमांना पाठिंबा होता, याचा उद्धव ठाकरेंनी विचार करावा आणि राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍याबद्दल बोलताना ते म्हणाले, की उद्धव ठाकरेंना अयोध्येत चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा पक्ष आता अयोध्येत जाऊन पोहोचला आहे. यासोबतच मीदेखील लवकरच अयोध्येला जाऊन दोन्ही धार्मिक गटांतील नागरिकांशी संवाद साधून हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे.

No comments

Thank you for your feedback.