Header Ads

ad

आता मी आयोध्येला जाणार : आठवले

पुणे,25 नोव्हेंबर (के.न्युजपोर्टल)
देशात सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसैनिक अयोध्येला गेले आहेत. या मुद्यावरून बोलताना आज पुण्यात पत्रकार परिषदेमध्ये माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ’’उद्धव ठाकरे परत आल्यावर मी आयोध्येला जाणार आहे’’ असे सांगितले.
याबाबत बोलताना त्यांनी ’’राम मंदिराचा प्रश्‍न समोपचाराने सोडवावा. राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये.’’ अशी भूमिका मांडली.
’’एल्गार परिषदेचा भीमा कोरेगावच्या प्रकरणाशी संबंध नाही’’ असे ते म्हणाले. तसेच, ’’मोदींची हवा 10 ते 15 वर्ष राहणार आहे. त्यानंतर मी विचार करेन.‘ , असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments

Thank you for your feedback.